कोल्हापूर मधील 24 बंधारे पाण्याखाली राधानगरीतून 1400 तर कोयनेतून 2111 क्युसेक विसर्ग सुरू

कोल्हापूर,दि. १०
प्रतिनिधी : भूमिरक्षक न्यूज नेटवर्क टीम कोल्हापूर.



जिल्ह्यातील राधानगरी धरणात 130.70 दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 वा. च्या अहवालानुसार राधानगरी धरणाच्या विद्युत विमोचकातून 1400 तर कोयना धरणातून 2111 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जांबरे मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेला आहे.
पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, इचलकरंजी, रुई, शिरोळ व तेरवाड, वारणा नदीवरील चिंचोली, भोगावती नदीवरील राशिवडे, हळदी, सरकारी कोगे आणि  खडक कोगे, वेदगंगा नदीवरील निळपण, वाघापूर, कुरणी, सुरूपली, बस्तवडे व चिखली, हिरण्यकेशी नदीवरील साळगाव व ऐनापूर, ताम्रपर्णी नदीवरील कुतनवाडी व चंदगड, दुधगंगा नदीवरील दत्तवाड व सिध्दनेर्ली, असे एकूण 24 बंधारे पाण्याखाली आहेत. नजिकच्या कोयना धरणात 40.99 टीएमसी तर अल्लमट्टी धरणात 84.463 इतका पाणीसाठा आहे.
जिल्ह्यातील धरणांमध्ये  पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. तुळशी 47.17 दलघमी, वारणा 503.39 दलघमी, दूधगंगा 401.06 दलघमी, कासारी 40.93 दलघमी, कडवी 33.65 दलघमी, कुंभी 42.24 दलघमी, पाटगाव 62.32 दलघमी, चिकोत्रा 19.41 दलघमी, चित्री 20.46 दलघमी, जंगमहट्टी 16.20 दलघमी, घटप्रभा  44.17 दलघमी, जांबरे 23.23 दलघमी, कोदे (ल पा) 6.06 दलघमी असा आहे.
   तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 26.8 फूट, सुर्वे 25.4 फूट, रुई 55.6 फूट, इचलकरंजी 52.6 फूट, तेरवाड 47.6 फूट, शिरोळ 37 फूट, नृसिंहवाडी 35 फूट, राजापूर 24.6 फूट तर नजीकच्या सांगली 10 फूट व अंकली 12.10 फूट अशी आहे.